
सह्याद्रीच्या भौगोलिक स्थितीचा शिवाजी महाराजांनी जितक्या कौशल्याने
वापर करून घेतला तेवढा संपूर्ण भारतात कोणीही, कधीही केला नव्हता. मावळी
प्रांतातील डोंगर-दऱ्यांमुळे इथे शत्रूंचा शिरकाव कठीण होता. कोकणात
उतरायचे तर एका घाटाने उतरावे लागणार. यावेळी शत्रूला त्रास देता येतो.
प्रतापगडाचे युद्ध हा भौगोलिक स्थितीचा कुशलतेने वापर करून केलेल्या
युद्धाचा अप्रतिम नमुना आहे. उंबरखिंडीचे युद्ध हे डोंगराळ भागाचा फायदा
उठवून आपल्यापेक्षा संख्येने अतिशय जास्त असणाऱ्या शत्रूला दाती तृण धरायला
कसे लावू शकतात याचे उदाहरण आहे.
डोंगरदऱ्या सैन्य कसे खाऊन टाकतात ते इथे दिसते.
- वेध महामानवाचा (डॉ. श्रीनिवास सामंत).
#DoodleOfShivray
संदर्भ :
आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची
No comments:
Post a Comment